ताज्या घडामोडी

फलटण शहरात मुसळधार पावसाने साठलेल्या पाण्याचा व भुयारी गटार योजनेचा कसलाही संबंध नाही – श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – गेली चार दिवस फलटण शहरामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे फलटण शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे मात्र या साचलेल्या पाण्याचा व भुयारी गटार योजनेचा कोणताही संबंध नसल्याचे प्रतिपादन फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

विरोधी पक्ष चुकीची असून केवळ राजकारणाचा द्वेष म्हणून फलटणकर नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवून देत असल्याचे श्रीमंत रघुनाथ राजे म्हणतात
भुयारी गटर योजना नक्की काय आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे ते विरोधी पक्षांनी पहावे, भुयारी गटर योजना ही घरगुती सांडपाणी व मलनिस्सारण करण्यासाठी आहे. अजुन ती योजना सुरू झाली नसून ही योजना पावसाळ्यातील पाणी वहन करणारी योजना नसल्याचेही यावेळी रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले.
रिंगरोड येथील गटार कोणी बांधले रस्त्यापेक्षा गटर वरती बाधले आहे. ज्या ठेकेदाराने हे गटार बांधली आहे. तो ठेकेदार खासदार गटात आहे. विनाकारण पडलेल्या मुसळधार पावसाचा दोष राजे गटाला देऊ नये. पावसाचे पाणी आणि भुयारी गटर योजना यांचा काहीही संबंध नाही. पावसाचे पाणी भुयारी गटारा मधून सोडले जाणार नाही. फलटण शहरांमध्ये अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचत होते. याबाबत यापूर्वी नगर परिषद माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने पाईपलाईन कामे हातात घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवल्या आहेत.
विनाकारण नागरिकांच्या मध्ये गैरसमज करून देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाकडून सुरू आहेत. मागील दोन दिवसात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने काही सखल भागात पाणी साचत आहे. सोशल मीडियावर माहिती नसलेल्या योजनेवर चुकीचे बोलून गैरसमज पसरवण्यापेक्षा अभ्यास करून बोलावे असे मत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.