ताज्या घडामोडी

बरड ते मिरढे,जावली,आदरुंड रास्ता बनलांय मृत्यूचा सापळा ; प्रशासनाचे दुर्लक्ष

साईट पट्टया खचल्याने डब्बल वाहणं बसणं होतंय अवघड

(जावली/अजिंक्य आढाव)- सध्या श्रावण महिना  समाप्त होत चालला तरी शिंगणापूरची गर्दी हटेना भाविकांची अलोट गर्दी या वर्ष पाहिला मिळाली, महादेव डोंगर रांगेत महाराष्ट्र कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी करतात यातच शिखर शिंगणापूर कडे मोठी गर्दी होत आहे अशातच बांधकाम विभागा कडून जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जाते असल्याचे नागरिकांमधुन बोलले जात आहे.

फलटण शिंगणापूर रस्त्यावरील साईट पट्टया खचल्याने रात्री चे अपघातात वाढ

बरड ते मिरढे रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावर मुरुमीकरण करण्यात आले होते परंतु रोडवरील मोठमोठ्या चारी मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही शालेय, शासकीय कर्मचारी माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर, आदंरुड,व शालेय विद्यार्थां या भागातुन प्रवास करत असतात मात्र मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे अतिशय खराब झाल्याने रस्त्याच्या कामकाज बाबतीत शंका निर्माण केले जाते आहे.रोडवरील खड्डे दिड फुट खोल व संपूर्ण रस्त्यावर खडी वाहुन गेल्याने दुचाकीस्वारांची तर दयना उडत आहे,तर नवख्या चालकांकडून खड्डे चुकवताना अपघात समोरे जावं लागतं आहे.

मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे

आगामी गणेशउत्सवा दरम्यान सुट्टीमुळे जावली ( सिद्धनाथ मंदिर )शिखर शिंगणापूर( शंभू महादेवाच्या दर्शनासाठी), गोंदवले (गोंदवलेकर महाराज) प्रत्येक महिन्याला वारीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे.सध्या ‌पावसाळा सुरू असल्याने खंड्या मधे पाणी साचून अंदाज न आल्याने अपघात होत आहेत.या कडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी बरड ,जावली,मिरढे, आदंरुड,कोथळे ग्रामस्थांच्या वतीने तत्काळ रस्ता दुरुस्ती ची मागणीला जोर धरत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.