फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा- फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की गेली चार दिवस फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक गावातील व गावाबाहेरील ओढ नाले यांना पूर आला आहे. त्यामुळे काही काम नसेल तर उगीचच नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन फलटण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

सुनील महाडिक म्हणतात की, मुसळधार पावसामध्ये शक्यतो बाहेर अति महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे अन्यथा बाहेर येताना गावाबाहेरील ओढे नाले सर्व बाजूने तुडुंब वाहत असतील तर त्यातून चुकूनही वाट काढू नये. कारण पावसामुळे तो ओढा नाला किती खचला आहे याचा अंदाज लागत नाही. व त्यामुळे दुर्घटना घडू शकते फलटण शिंगणापूर रोड सोनगाव निर्णय पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या गावातून फलटणला येणारा रस्ता बंद आहे. त्याचबरोबर विंचुरणीचे बाणगंगा धरण हे सुद्धा झाल्याने रस्त्यावर पाणी येत आहे. त्याचबरोबर पावसाची सतत धार सुरू असून अनेक गावांच्या ओढ्याच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे शक्यतो नागरिकांनी या कालावधीमध्ये ओढा ओलांडण्याचे धाडस करू नये. असे ही शेवटी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक म्हणाले आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.