प्रतिनिधी- फलटण शहरातील प्रभाग क्र १२ मधील संजीवराजेनगर, हाडको गोळीबार मैदान,विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय परिसरात, बारवबाग मध्ये जवळपास एक ते दिड हजार पेक्षा अधिक कुटुंब राहत आहेत या परीसरातील नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्याचबरोबर पाणी कधीही सोडले जाते तरी या भागामध्ये नियमित पाणीपुरवठा व योग्य दाबाने करावा अन्यथा फलटण नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार असून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा श्रीमंत रामराजे युवामंच संस्थापक अध्यक्ष राहुलभैय्या निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे राहुलभैया निंबाळकर म्हणतात की, नगरपरिषदेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय नाही. कोणाचाच कोणावर दबाव राहिला नसून अनेक वेळा याबाबतीत मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली तरी तेवढ्यापुरती सुधारणा होत असते पुन्हा मागचे दिवस पुढे असेच चालू राहिले आहे. वास्तव परिस्थिती मुख्याधिकारी यांच्या पासून लपवून ठेवली जात आहे.
मुख्याधिकारी साहेब यांनी या विषयांमध्ये लक्ष घालून हा प्रश्न निकाली लावावा अशी विनंती ही राहुलभैया निंबाळकर यांनी केली असून ते पुढे म्हणतात खरंतर या परिसरातील नागरिक सर्वात जास्त व नियमित नगरपरिषदेचा कर भरत असतात तरी देखील या भागातील नागरिकांवर हा अन्याय होत आहे. तरी मुख्याधिकारी साहेब यांनी हा अन्याय दूर करून नियमित योग्य दाबाने व एक तास पाणी पुरवठा करणे कामे संबंधित पाणीपुरवठा विभागाला आदेश करावा असे शेवटी राहुल भैया निंबाळकर म्हणाले आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.