फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अपक्ष म्हणून निवडणूक लढले व प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. यानंतर खऱ्या अर्थाने फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सुरु झाले. म्हणून श्रीमंत रामराजे हे फलटण तालुक्याला लाभलेल अनमोल-रत्न असल्याचे प्रतिपादन सस्तेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
यावेळी ते पुढे म्हणतात की, फलटण तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. ही दुष्काळी तालुक्याची ओळख पुसण्याचे काम खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून झाले त्यांनी कृष्णा खोरे अंतर्गत असणारे निरा- देवघर व धोम- बलकवडी हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावले त्या दोन्ही प्रकल्पाचे पाणी फलटण, खंडाळा व माळशिरस तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेहण्याचे काम करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती केली. व तालुक्यात जलक्रांती केली तसेच फलटण तालुक्यामध्ये बंद पडलेले दोन्ही कारखाने सुरू करून तालुक्यातील शेतकरी कामगार व व्यापारी यांचे प्रपंच वाचवण्याचे मोठे महान कार्य हे श्रीमंत रामराजे यांच्यामुळे झाले आहे. आज साखरवाडी व श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असता तर काय व्यापार पेठेची अवस्था झाली असती याची कल्पना देखील करू शकत नाही. आज तो विचार सहन होणारा नाही म्हणून खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे हे या फलटण तालुक्याला लाभलेल अनमोल रत्न आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे शेवटी दादासाहेब चव्हाण म्हणाले.
Back to top button