ताज्या घडामोडी

अनुप शहा यांनी भान ठेवून ठेवून आरोप करावेत:जनता कंटाळली खोट्या आरोपांना- प्रितसिंह खानविलकर

श्रीमंत रामराजे यांनीच केली जलक्रांती व औद्योगिक क्रांती केली

फलटण प्रतिनिधी  ‘‘अनुप शहा यांनी भान ठेऊन आरोप करावे आम्ही पण जशताशे उत्तर देयाला तयार आहे .
आजवर तालुक्यात कुणी ‘जल क्रांती ’ केली कुणी ‘औद्यागिक क्रांती, केली आणि कुणी ‘विकासकामे’ केली हे जनतेला चांगले ठाऊक आहे’’, असा टोला राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.

फलटण शहरात कमिंन्स कंपनी वरुन जे आरोप अनुप शहा यांनी केले यांच्या टिकेला उत्तर म्हणून प्रितसिंह खानविलकर यांनी सदरचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
कमिन्स इंटरनॅशन कंपनी आहे त्या मुळे ती सरकारच्या नियमाप्रमाणे चालते त्यामध्ये कोणताही राजकिय हस्तक्षेप होत नाही तसे असते तर कँटरिंगच काँट्रॅक्ट तुमच्या कार्यकर्त्याला मिळाले नसतं, महाराज साहेबांच्या अथक प्रयत्नानी आणलेली कंपनी आहे. फलटण तालुक्याचं नंदनवन झालं, जिथे कोणी विचार करु शकत नाही तिथे रोजगार निर्मिती झाली, कंपनी मध्ये पगार प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्किलवर मिळतो
उगाच इलेक्शन आले की, काहीतरी बिनबुडाचे आरोप कारणे एवढेच काम विरोधकांना शिल्लक राहिलेले आहे.
जर एवडा आपणाला कळवला होता तर एवड्या दिवस गप्पा का होता ? का कंपनी कडून मालिदा लाटत होता का ?
हे असले पब्लिसिटी साठी स्टंटबाजी चालू आहे ती बंद करावी

‘‘जनतेने तुमची जागा लोकसभा निवडणूकीत दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणूकीतही जनता तुम्हाला कात्रजचाच घाट दाखवून देणार आहे. जर तुमच्या कार्यकर्तांची गुन्ह्यांची लिस्ट काढली तर खुन, खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग, खंडणी , हनीट्रैप इत्यादि गंभीर गुन्हे आहेत तुमचा तर शंभर तोंडाचा रावण तयार होईल तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून खोटे आरोप केले तरी यावेळेस तुम्हाला नक्की जनता घरी बसवणार आहे. आमचे नेते कायम जनतेच्या सेवेसाठी असतात कधी पक्षपात जातिभेद करत नाहीत. आमचे मित्र अनुप शहा यांनी नेत्याला खूश करण्याच्या नादात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षा करु नये आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या अशी उपरोधिक टिकाही प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.