ताज्या घडामोडी

श्रीमंत संजीवराजे, दिपक चव्हाण यांनी आपत्तीग्रस्त वाखरी, ढवळ, पिराचीवाडी मुळीकवाडी गिरवी या गावांना दिल्या भेटी

नुकसान ग्रस्त : भागांना भेटी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण तालुक्यात व शहरात ढगफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना या पावसाची झळ मोठ्या प्रमाणावर बसल्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

तसेच बाणगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे देखील अनेक कुटुंबांना याची बाधा निर्माण झाली या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आ. दिपक चव्हाण त्याचबरोबर फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.


आज फलटण तालुक्यातील वाखरी, ढवळ, पिराचीवाडी, मुळीकवाडी व गिरवी या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या व अनेक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर गिरवी व बोडकेवाडी या दोन गावांना जोडणारा पूल कोसळला होता.

त्यामुळे या दोन गावांमधील दळणवळण व्यवस्था बंद पडली होती. या ठिकाणी तात्काळ जेसीबी मशिन बोलावून ही दळणवळण व्यवस्था तात्काळ सुरू केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.