आपला जिल्हा
महादेव जानकर : साधेपणातून उभं राहिलेलं महत्त्वाकांक्षी नेतृत्व

(फलटण/ प्रतिनिधी)- महादेव जानकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात एक आगळा वेगळा ठसा उमटवणारं नेतृत्व आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम करताना ग्रामीण भागातील प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले.
पण त्यांच्या राजकीय प्रवासापेक्षा जास्त चर्चा होते ती त्यांच्या जीवनशैलीची, विचारांची आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेची सर्वसामान्य माणसाने देखील मोठ्यात मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत मोठी स्वप्न पाहणं म्हणजे काय गुन्हा होऊ शकत नाही याच विचाराने प्रेरित होऊनमहादेव जानकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीत झाली. ग्रामपंचायतीत कोणतंही मोठं पद नसताना त्यांनी थेट देशाच्या पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहिलं.
“मी या देशाचा पंतप्रधान होणार” ही त्यांची सुरुवातीची घोषणा त्या काळात या घोषणांची अनेकांनी खिल्ली उडवली मात्र पण याच महत्त्वाकांक्षेने त्यांना पुढे नेलं व या राज्याच्या पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय या खात्याचे कॅबिनेट मंत्री बनविले.साधेपणा हीच ओळखउच्च शिक्षण घेतलेलं असूनही जानकर यांनी कधीही ऐश्वर्यशाली जीवनशैली स्वीकारली नाही.मेंढपाळांच्या पालावर मुक्काम शेतकऱ्यांच्या शेतात राहणं, सामान्य लोकांसोबत जेवण,स्वतः कार्यकर्त्याच्या शेतात नांगरणी करणं,ही त्यांची जीवनशैली आजही कायम आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांनी हा साधेपणा सोडला नाही, ही बाब त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवते.
सामान्य माणसाशी घट्ट नातं
महादेव जानकर यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. सत्ता ही जनतेसाठी असते ते नेहमीच शेतकरी, मेंढपाळ, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
सामाजिक न्यायाचा ठाम विचार
“जितनी संख्या भारी , उतनी उसकी राजनीतिक भागीदारी” हा त्यांचा मुख्य विचार आहे.
या तत्त्वानुसार:
समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे,राजकारण, शिक्षण, प्रशासन आणि इतर क्षेत्रांमध्ये समतोल सहभाग असावा हा विचार त्यांनी केवळ मांडलाच नाही, तर त्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले.
मंत्रीपदाचा कार्यकाळ
महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर भर दिला.



