ताज्या घडामोडी
आशिया कप टी२० – २०२५” च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा केला दणदणीत पराभव
आशिया कप स्पर्धेत भारत विजयी ५ विकेट राखून

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कप चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा तब्बल ५ विकेट राखून दणदणीत पराभव केला व जगाला दाखवून दिले मैदान कोणतेही असो विजयी आम्हीच होणार हे पाकिस्तान संघाला दाखवून दिले.

अगदी विजयाच्या समीप आल्यानंतर फटकेबाजीच्या नादात शिवम दुबे बाद झाला अखेरच्या षटकात ६ बॉल आणि १० धावा आवश्यक होत्या. पहिल्याच चेंडूवर वर्माने षटकार ठोकला व रिंकू सिंग यांनी विजयाचा चौकार ठोकून भारताने ५ विकेट राखून पाकिस्तानवर विजयी मिळवता आला व सर्व भारतभर एकच जल्लोष झाला.


