फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – अहिल्यानगर -बारामती- फलटण- दहिवडी मार्गे सांगली कडे जाणारा हा महामार्ग फलटण शहराच्या नाना पाटील चौक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक कोळकी, दुधेबावी, झिरपवाडी भाडळी त्या मुळे या मार्गावरुन जाण्याचे प्रस्तावित आहे यामुळे फलटण शहरातील अनेक चौकामधून जात असल्यामुळे या भागात असणाऱ्या इमारतींना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे.
या मुळे बारामती पुल ते नाना पाटील चौक, रिंगरोड व कोळकी रोड वरील सर्व व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होणार आहे व वाहतूकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. या साठी हा महामार्ग फलटण शहरा बाहेरून काढला जावा म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांच्या निवासस्थानी या भागातील सर्व व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक, कोळकी, भाडळी या भागातील शेतकरी यांची महत्त्वाची मिटिंग आज सायंकाळी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता श्रीमंत रामराजे यांच्या बंगल्यावर आयोजित केली आहे.
तरी सदर मीटिंगसाठी सर्व व्यापारी छोटे-मोठे व्यावसायिक व या मार्गावरील सर्व विस्थापित होणाऱ्यांनी या नागरिकांनी कागदपत्रासह महत्त्वाच्या मिटिंगसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.